
मंत्रालयात पत्रकारांना देखील बंदी असल्याने सामान्यांचे हाल कोण काढणार? मुख्यमंत्री लक्ष देतील का?
मंत्रालयात पत्रकारांना देखील बंदी असल्याने सामान्यांचे हाल कोण काढणार? मुख्यमंत्री लक्ष देतील का?
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा गाढा जिथून हाकला जातो अशा मंत्रालयात पत्रकारांनाच बंदी असल्याने सामान्य माणसांचे काय हाल सुरू असतील याची कल्पना मुख्यमंत्री महोदयांनी जाणून घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व पत्रकार बांधव करत आहेत. सध्या मंत्रालयात फक्त अधिस्वीकृती धारक पत्रकारांना प्रवेश दिला जातो. मंत्रालयात आवक जावक विभाग असल्याने राज्यातील अनेक सामान्य नागरिक या ठिकाणी आपले पत्र डीसप्याच करण्यासाठी येत असतात. परंतु त्यांना मंत्रालयात प्रवेशच दिला जात नसल्याने त्यांचे पत्र हे डीसप्याच कसे होणार आणि त्यांना न्याय कसा मिळणार हा प्रश्न आवाचून उभा आहे.
मंत्रालयात नागरिक हे आपली कामे करण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी येत असतात परंतु आता त्यांना कोरोनामुळे प्रवेशच मिळत नसल्याने त्यांना न्याय कसा मिळणार. राज्यातील पत्रकार बांधवाना जर प्रवेश नसेल मिळत तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल याची जाणीव न केलेलीच बरी. मंत्रालयात आवक जावक विभाग हे आत असल्याने नागरिकांना प्रवेश नसल्याने फार त्रास होत असून हा आवक जावक विभाग जर मंत्रालयाच्या प्रवेश द्वार येथे आल्यास सामान्य नागरिकांना आपली पत्रे देता येतील आणि त्यांना न्याय मिळेल. तरी मुख्यमंत्री महोदय यांनी या बाबतीत जातीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी सर्व पत्रकार बंधू आणि सामान्य नागरिक करत आहेत.