राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?

राज्यपालांचा राजीनामा की आदेश ?

     राज्यपाल भगत सिंग कोशियारी यांनी मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला पदमुक्त करा अशी इच्छा व्यक्त केली असली तरी. राज्यपालांचा कारकीर्दीचा इतिहास, कार्यकाळात घेतलेले निर्णय, केलेली भाषणे, वक्तव्य ई.. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, विधान परिषदेत १२ आमदारांची नियुक्ती. शिंदे गट, भाजप युतीची सत्तेत घेतलेले निर्णय. (न्यायालयात प्रलंबित आहेत.) मराठी माणसाच्या विरोधात गुजराती मारवाडी मुळे मुंबईची भरभराट झाली. मराठी माणसांनी इंगा दाखवल्यानंतर माफी. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा अपमान. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार अपमानास्पद वक्तव्य. इ कारणांमुळे राज्यभरात राज्यपालान विरुद्ध काळे झेंडे, मोर्चे आंदोलने, निषेध व्यक्त होत आहेत. त्याविरुद्ध केंद्रीय गृहमंत्री कडे गाऱ्हाणे घालण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती करण्यात आली. अशा अनेक कारणांमुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप विरुद्ध जनमानसावर निश्चितच परिणाम होणार असल्याची खात्री होऊ लागल्यामुळे, आणि आता राज्यपालांची उपयुक्त संपली असली तरी, राज्यपाल हे राज्याचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ पद असल्यामुळे नेतृत्वाला कोणते तरी कारण दाखवणे आवश्यक आहे. म्हणून राज्यपाल म्हणतात महाराष्ट्र सारखा समाजसुधारक व शुरवीरांची महान भूमीचा राज्यसेवक होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्यासाठी भाग्यवान आहे. राज्यातील जनसामान्य कडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. असे पश्र्चातापाने म्हटले असले तरी उशीरा सुचलेले शहाणपण असून शेवटी केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आले की कोणाचीही चालत नाही. या न्यायाने राज्यपाल कोशियारी यांचा राजीनामा हा आदेश/ इच्छापूर्ती की निवृत्ती? 


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week