स्वामी कट्टा पालखी सोहळ्यात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन !

स्वामी कट्टा पालखी सोहळ्यात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन !

         मुंबई: आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने या वर्षी कार्याध्यक्ष- भास्कर साळुंके यांच्या संकल्पनेने प्रथमच पालखी सोहळ्यात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्वामी भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला.

          वेशभूषा स्पर्धा चार गटात घेण्यात आली. छोट्या गटात (मुली)-स्वानंदी मेस्त्री, प्रज्ञा साळुंके, (मुलगे) - मयांक कदम, सत्यम चाफेकर, शिवम चाफेकर, अंतिम विजयी झाले.

       खुल्या गटात-(महिला) स्नेहल पाटील, कुंदना पंडित, शितल आंबेकर व (पुरुष) गटात  जगदीश सावंत हे अंतिम पुरस्काराचे मानकरी ठरले.

        सर्व विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम, देऊन गौरविण्यात आले.

        स्पर्धेचे परीक्षण - पत्रकार- अनघा सावंत व समुपदेशक - अश्विनी कदम यांनी केले. व्यासपीठावर श्री स्वामी कट्टा परिवाराचे अध्यक्ष-बाळ पंडित, 

सचिव-राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष- भास्कर साळूके व कोषाध्यक्ष-रवींद्र रेवडेकर उपस्थितीत होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित