निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बेलवाडी येथे केले श्रम दान !

निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बेलवाडी येथे केले श्रम दान !

       (वार्ताहर - अभिजीत पेठे) कांदिवली येथील निर्मला मेमोरियल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत सात दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते निर्मलाकॉलेज गेल्या चार वर्षांपासून आदिवासी पाड्यांच्या विकासासाठी काम करत आहे या वर्षी निर्मला कॉलेजच्या एनएनएस विभागातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पाड्यात श्रमदानाचे कार्य पार पाडले.

       पालघर जिल्हातील बेलवाडी गावामध्ये ६०० पर्यतची लोकसंख्या आहे. तसेच या आदिवासी पाड्यात ८०घरे आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून निर्मला कॉलेजच्या एनएसएस कामे करत आहेत. बंधारा बांधणे वाॅलपेंनटिग झेड.पी शाळेसाठी,  महिला मार्गदर्शन ,आश्रमशाळेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले,सोकपिट बांधणी,शेयर अॅड केयर योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आणि खेळणी,तेथील ग्रामीण लोकवस्ती कपडे देण्यात आली. श्रमदानातून एनएसएस स्वयंसेवकांनी दोन बंधारे बांधून वन्यजीवांना पाण्याची सोय करून देण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलनाची माहिती पाड्यातील ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांना सहाय्यक कर्मचारी व शिक्षकांना देण्यात आली. शिक्षणातील गोडी वाढविण्यासाठी आकर्षक कलाकृती वाॅलपेंनटिगच्या माध्यमातून पाड्यातील ग्रामीण शाळेच्या भिंतीवर करण्यात आली. सोकपिटाची बांधणी करून बोरवेलचे पाणी जिरवण्याचा उपक्रम पार पाडला. सेल्फ हेलप ग्रुप च्या मदतीने पाड्यातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर सात दिवसामध्ये एनएसएस स्वयंसेवकांना सामाजिक आणि नैसर्गिक घडामोडींचा आढावा जवळून घेता आला.एनएसएस महणजे राष्ट्रीय सेवा योजना परंतु समाजकल्याणाच्या कार्या मध्ये प्रथमतः स्वता मधील बदल करण्याची जाणिव एनएसएस कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघा जुवेकर आणि रिषभ देसाई यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week