
श्री दत्त भक्तांनी पुरग्रस्थांना दिला मदतीचा हात...
मुंबई करिरोड पश्चिम येथील श्रीदत्त जयंती उत्सव मंडळ, वंदे मातरम क्रीडा मंडळ, शिव कृपा रहिवाशी संघ व आदिनाथ सांप्रदायिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सदाशिव (भाऊ) भोसले यांच्या मार्गदर्शना खाली, नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या गावांना भेट देऊन मदत कार्य करण्यात आले.
दत्त भक्तांनी एकत्र येऊन, सामाजिक बांधिलकी या भावनेने रोख रक्कम, कपडे, साड्या, भांडी, शेगडी, धान्य, गुरांना पेंड (सुग्रास), जीवनावश्यक वस्तू जमा केल्या. खेड तालुक्यातील - पोसरे, दळवरने (नलावडे वाडी), चिपळूण तालुक्यातील - मिरजोळी जुवाडबेटे गावांना भेटी देऊन जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने केले. मदत कार्यात सदाशिव भोसले सह अवधूत निकम, संजय हातकर, मुकुंद निकम, संदीप काणेकर, बळीराम धामणे, राजेंद्र खांडेकर, नरेंद्र कारंडे, गोविंद शिंदे, अनिल पेडणेकर, किरण गावडे, शांताराम पावले व विश्वनाथ डाकवे यांचा मोलाचा सहभाग होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील पुरग्रस्थांना आम्ही एक खारिचा वाटा म्हणून भेटी देऊन जीवनावश्यक वस्तू दिल्या असल्याचे सदाशिव भोसले यांनी व्यक्त केले आहे.