आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का ?

आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का ?

       कथा म्हणू की व्यथा म्हणू ! आता मेडल्स विकणे आहे !!

    हे घडलयं एका वरळीत राहणाऱ्या खेळाडु सोबत नाव ओम प्रविण साटम. राज्य आणि राष्ट्रीय स्तराचा एक नामांकित जलतरणपट्टु, मेहनती, जिद्द चिकाटी असलेला वरळीची शान असलेला खेळाडु, वडील दुर्दैवाने पोलीस प्रशासनात हो दुर्दैवानेच कारण एवढी नोकरी करुन मुलासोबत प्रॅक्टीस ग्राऊंडवर झिजणारा बाप.... जो प्रशासनाकडे शासकीय दाद मागु शकत नाही का तर कारवाई होईल. जितकी मेहनत त्याचे प्रशिक्षक श्री. अमित टेमकर सर घेतात त्याला ११०% प्रतिसाद देणारा खेळाडु.



        आता बोलु शासनाच्या खेळाडुच्या धोरणांवर १६ मार्च २०२० सर्व जलतरण तलाव बंद. ५ नोव्हेंबर २०२० फक्त राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडुकरता चालु करण्यात आले. ६ एप्रिल २०२१ रोजी पुन्हा तरणतलाव बंद करण्याचे आदेश. ५ नोव्हेंबर २०२१ ला पुन्हा राज्य व राष्ट्रीय खेळाडुसाठी सुरु केलेला पुल ८ जानेवारी २०२२ ला बंद. मी म्हणतो आहेत किती खेळाडु ? ५ जास्तीत जास्त ८ खेळाडु आहेत सराव करणारी तरी हे निर्बंध म्हणजे या अश्या खेळाडूंवर राज्य सरकारकडून होणारा हा अन्याय नाही का? अश्या ह्या खेळाडूंवर त्याची सर्व मेडल्स विकण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. अन्यथा त्याला राज्य सोडण्याचा पर्याय निवडावा लागेल. जमलं तर वाचल्यावर शांत रहा... आणि ओम प्रविण साटम आपला वरळीचा विद्यार्थी म्हणा किंवा खेळाडू म्हणा त्याला जर न्याय मिळावा असे वाटत असेल तर शेअर करा.....


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week