महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मुंबई काँग्रेस तर्फे २ कोटी रुपयांची अत्यावश्यक सामग्री आणि वैद्यकीय सेवा पुरविली जाणार !!

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मुंबई काँग्रेस तर्फे २ कोटी रुपयांची अत्यावश्यक सामग्री आणि वैद्यकीय सेवा पुरविली जाणार !!

       मुंबई महानगरपालिकेने लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरु करावी, तसे न झाल्यास या विरोधात मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार !

    अतिवृष्टीमुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः कोकण पट्ट्याला त्याचा पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेकांचे प्रचंड हाल झालेले आहेत. अनेकांचे घर संसार वाहून गेले, खूप मोठया प्रमाणात सगळ्यांचे नुकसान झालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात नुकसान झालेले आहे. परंतु पूरपरिस्थिती सुदैवाने व प्रशासनाच्या हालचालींनी आता ओसरू लागली आहे. परंतु रत्नागिरी व रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः महाड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा अशा ७ तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे. म्हणूनच मुंबई काँग्रेसतर्फे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पूरग्रस्त भागातील काँग्रेस नेत्यांच्या बैठक घेण्यात आल्या. सर्वप्रथम मुंबई काँग्रेसतर्फे या पूरग्रस्त विभागाचा आढावा घेण्यात आला व या विभागात अत्यावश्यक सामग्री आणि वैद्यकीय सेवा पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे साधारणपणे २ कोटी रुपयांची अत्यावश्यक सामग्री पाठविण्यात येणार आहे. त्यात साधारणपणे १० हजार ब्लॅंकेटस, १० हजार चटई तसेच, तसेच प्रत्येकाला एक किट देण्यात येईल. ज्यामध्ये कपडे, मेडिकल किट, अन्यधान्य, गृहोपयोगी भांडी व संसाधने असणार आहेत. आमचे एक वैद्यकीय पथक सुद्धा तिथे जाणार आहे. या सामग्री खरेदीसाठी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार अमीन पटेल यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई काँग्रेसतर्फे पूरग्रस्त मदतकार्य समन्वय कारण्यासाठी एक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच मुंबई काँग्रेसतर्फे जनतेला आवाहन करण्यात येत आहे की,  पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी व अत्यावश्यक सामग्री पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सढळ हस्ते मदत करावी. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी या पत्रकार परिषदेत दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week