स्वराज्य फाऊंडेशनद्वारे गरजूंना मोफत अन्न वाटप !

स्वराज्य फाऊंडेशनद्वारे गरजूंना मोफत अन्न वाटप !

         मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रदुर्भावामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू  झाले आहेत. आता पुन्हा अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. यासाठी स्वराज्य फाऊंडेशनने पुढाकार घेऊन काळाचौकी, शहीद भगतसिंग मैदान येथे गेले दहादिवस अव्याहतपणे अन्नदान छत्र सुरू ठेवले होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत भोजनाच्या उपक्रमाचा हा समारोप बेस्ट कमिटीचे माजी चेअरमन तसेच विद्यमान नगरसेवक अनिल कोकीळ आणि ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ माटल यांच्या प्रमूख उपस्थितीत नुकतेच पार पडले.

    मागील टाळेबंदीत जेवण न मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे विशेषत: हातावर ‌पोट असणा-या गरिब नागरिकांचे फार मोठे हा‍ल झाले होते. तसे आता होऊ नये यासाठी स्वराज्य फाऊंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.

       या उपक्रमाचे सर्वत्र विशेष कौतुक होत असून या उपक्रमास विविध पक्षाच्या मान्यवरांनी  सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमास शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, मुंबई शहर स्थापत्य समितीचे अध्यक्ष तसेच नगरसेवक दत्ता पोंगडे, शहर स्थापत्य समिती उपाध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक सचिन पडवळ, शिवसंग्राम पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजन घाग, नगरसेवक तसेच बेस्ट कमिटीचे माजी चेअरमन अनिल कोकीळ, ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ माटल, २०५चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, शाखा क्र.२०५चे मनसे शाखाध्यक्ष राजेश मोरे, डाॅ.प्रागजी वाजा, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे ब्लाॅक अध्यक्ष उमेश येवले, भाजपचे वाॅर्डअध्यक्ष गणेश शिंदे, समाजसेवक मुश्ताक नाखवा, विकासक अजय गुप्ता, पत्रकार केतन खेडेकर तसेच गार्डन ग्रुप यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय पवार यांचे तोंडभरून कौतुक केले तसेच या उपक्रमासाठी या सर्वांनी शुभेच्छाही दिल्या.

       स्वराज्य फाऊंडेशनचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नितिन कोलगे, संतोष शेट्ये, फतेहसिंह गुजर, पत्रकार राजेंद्र साळसकर, अशोक पवार, पूनम पवार, वैभव पवार, वैभव सावंत, किरण कासले, अभिषेक कुळये, अभिजित जाधव आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेत आहेत.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week