महाराष्ट्रात लॉकडाउन नकोच : भाई जगताप !!

महाराष्ट्रात लॉकडाउन नकोच : भाई जगताप !!

        या अगोदर सरकारने जो लॉकडाऊन केला होता त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले असून अनेकांचे रोजगार गेलेले आहेत हीच परिस्थिती परत भाऊ शकते त्यामुळे सरकारने पुन्हा लॉक डाऊनचा विचारच करू नये अशी माहिती शुक्रवारी मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेस अध्यक्ष श्री भाई जगताप यांनी दिली.

       राजीव गांधी भवन मुंबई काँग्रेस कार्यालय येथे मुंबई अध्यक्ष श्री भाई जगताप आमदार यांनी आज पत्रकार परिषद भरविली होती पत्रकार परिषदेमध्ये सध्या महाराष्ट्र सरकारने लोकडाउन संदर्भात जाहीर केलेले नियम हे अतिशय जास्त का आहेत याबद्दल मुंबई काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

        कारण असे की या पूर्वीच्या काळामध्ये कोविड १९ या कालावधीमध्ये लोकांनी अनेक हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे अशीच स्थिती नव्याने निर्माण होण्याची दाट शक्यता आहे म्हणून श्री भाई जगताप यांनी आव्हान केले की शासनाने नवीन नियमावली बनवावी जेणेकरून बेरोजगारी वाढणार नाही प्रस्तुत प्रकरणाचा मुंबई काँग्रेस पाठपुरावा करून नवीन नियमावली बनवायचा आटोकाट प्रयत्न करेल अशी माहिती भाई जगताप यांनी दिली या पत्रकार परिषदेस मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, खजिनदार संदेश कोंडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week