
आगरी समाज आता जागा झाला नाही तर नामशेष व्हायची पाळी येईल - प्रदीप साळवी
आगरी समाज आता जागा झाला नाही तर नामशेष व्हायची पाळी येईल - प्रदीप साळवी
आगरी तरुणांनी आता सरकारवर दबाव आणण्यासाठी एक व्हावे
- भांडुप येथे आगरी सेनेच्या आढावा बैठकीत मागणी !!
राजाराम साळवी यांनी विखूरलेला आगरी समाज एक करण्यासाठी आगरी सेनेची स्थापना केली. आज पर्यंत आपण विविध राजकीय पक्षाच्या पालख्या उचलण्याचे काम करतोय. आज सर्व समाजाने एकत्र येऊन आपली ताकद दाखविली पाहिजे. आपली संख्या आता कमी झाली आहे. आपला आगरी समाज, आपली गावे, जमिनी, व्यवसाय आणि अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा. सरकारवर दबाव आणावा. आपल्या जमिनी, घरे, व्यवसाय आणि तरुणांच्या नोकऱ्यांसाठी लढा देण्यास सज्ज व्हावे असे आवाहन आगरी सेना नेते प्रदीप साळवी यांनी समाज बांधवाना केले. निमित्त होते ते येत्या 1ऑगस्ट रोजी होणाऱ्या 36 व्या वर्धापन दिनाच्या भांडुप येथील आढावा बैठकीचे. यावेळी आगरी बांधवांकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्ला येथील एकविरा देवस्थान आणि परिसर यांच्या विकासाचा ठराव एकमुखाने करण्यात आला. याप्रसंगी प्रदीप साळवी, राहुल साळवी, कैलास पाटील, मुंबई अध्यक्ष जयेंद्र खुणे, विजय घरत, जयेश पाटील, नाशिक महानगर पालिका बांधकाम सभापती संपत डावखर, नगरसेवक किशोर बगाड उपस्थित होते विशेष म्हणजे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित भेटीसाठी मुंबईत आले होते. आगरी सेनेच्या मुंबईतील विविध विभागात पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. अकाउंटेन्ट असलेली तरुणी ममता पाटील यांची चेंबूर विधानसभा अध्यक्ष पद तर ऍडव्होकेट रितेश केणी यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली.
♦️ या बैठकीत लोणावळा येथील कार्लाची एकविरा देवी हि आगरी, कोळी, भंडारी, सीकेपी, तेली, माळी, कराडी व इतर समाजाची कुलदेवता असल्याने या देवस्थानाचा आणि परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी पुढे आली.
♦️अकाउंटेन्ट शैलेश माळी यांनी उपस्थित आगरी तरुण तरुणीना फक्त नोकरीवर विसंबून न राहता विविध व्यावसायिक संधी उपलब्ध असल्याने बँके कडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करावयात आगरी तरुणांनी बँके कडून सबसिडी घेऊन प्रॉन्स (शिवड) आणि क्रॅब (खेकडा) साठवण आणि विक्रीचा व्यवसाय करावा याला बाजारात प्रचंड मागणी आहे. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू असे म्हटले.