राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्यांदा “सुवर्ण श्रेणी” !

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्यांदा “सुवर्ण श्रेणी” !

       आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने देश पातळीवरील सर्व्हे मध्ये सुवर्ण श्रेणी मध्ये स्थान पटकावण्याची कामगिरी तिसऱ्यांदा केल्यामुळे संपूर्ण कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

       अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पुस्तकी ज्ञानाच्या बरोबरीने औद्योगिक जगतातील नवनवीन तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर होणारे बदल यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई, नवी दिल्ली) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या सर्व्हेमध्ये भारतातील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या  महाविद्यालयांची औद्योगिक जगताशी असणारी संलग्नता याविषयी आढावा घेऊन श्रेणी देण्यात येते.  या सर्व्हेमध्ये राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिसऱ्यांदा सुवर्ण श्रेणी प्राप्त केली आहे. २०१६, २०१७ आणि २०२० अशा तीन वर्षी देशपातळीवरील या महत्वपूर्ण सर्व्हेमध्ये सुवर्ण श्रेणीचा बहुमान प्राप्त करणारे कोकणातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. 

       या सर्व्हेमध्ये भाग घेण्यासाठी देशातील एकूण ८१४ व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या नामांकित महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त १८० महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला होता. या ८१४ महाविद्यालयातील केवळ २४५ महाविद्यालयांना सुवर्ण श्रेणीमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळाले. 

        या सर्व्हेमध्ये सहा वेगवेगळ्या परिमाणाद्वारे महाविद्यालयाची औद्योगिक जगताशी असणारी संलग्नता अभ्यासण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा महाविद्यालयाच्या विविध समित्यांमधील सहभाग व त्यांनी विद्यार्थ्यांना केलेले आधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे मार्गदर्शन, विद्यार्थी व प्राध्यापक यांनी पूर्ण केलेले औद्योगिक उपयुक्ततेचे प्रकल्प, विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतरच्या सुट्टीमध्ये केलेली इंडस्ट्रियल ट्रैनिंग, विविध इंडस्ट्रीमध्ये आयोजित केलेल्या स्टडी टूर्स, शिक्षण पूर्ण करून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांची विविध इंडस्ट्रीमध्ये नोकरीसाठी होणारी निवड तसेच काही विद्यार्थ्यांनी सुरु केलेले स्वतःचे व्यवसाय, महाविद्यालयातील उपलब्ध भौतिक सुविधा अशा विविध कसोटींवर महाविद्यालयांची कामगिरी तपासण्यात आली. 

       राजेन्द्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात औदयोगिक जगताशी संलग्नता निर्माण करून ती वृद्धिंगत करण्यासाठी इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन सेल अविरतपणे कार्यरत आहे. या सेलमध्ये प्रत्येक विभागातील एक प्राध्यापक समन्वयक म्हणून काम पहात आहे. प्रत्येक विभागासाठी एक शैक्षणिक सल्लागार समिती नेमण्यात आली असून त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील अनुभवसमृद्ध नामांकित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. विविध नामांकित उद्योगसमूहातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींना आधुनिक व प्रगत विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी नियमितपणे आमंत्रित केले जाते. यासाठी अनेक सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना द्वितीय तसेच तृतीय वर्षाची परीक्षा झाल्यानंतर आणि व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर किमान दोन ते तीन आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय विविध विषयातील आधुनिक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना तोंडओळख व्हावी यासाठी  इंडस्ट्रियल व्हिजीटचे आयोजन संबंधित विभागाकडून करण्यात येते. 

         या सर्व्हेमध्ये सुवर्ण श्रेणी संपादन करत ग्रामीण आणि दुर्गम भागात असूनही राजेंद्र माने महाविद्यालयाने प्रतिथयश शहरी महाविद्यालयांची बरोबरी केली आहे. यामुळे संपूर्ण कोकणातील  विद्यार्थी आणि पालक यांच्यातर्फे महाविद्यालयाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. रविंद्रजी माने यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. याआधीही महाविद्यालयाने इंडिया टुडे मासिकाच्या सर्व्हे मध्ये सलग तीन वर्ष भारतातील सर्वोत्तम दोनशे खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत स्थान मिळवले असून पाच वर्षासाठी नॅक ऍक्रेडीटेशनही प्राप्त केले आहे. या महाविद्यालयाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे कोकणातील कित्येक पालकांचे आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.    

        या सर्व्हेसाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख व इंडस्ट्री  इन्स्टिटयूट इंटरॅक्शन सेलचे प्रमुख डॉ. राहुल दंडगे यांनी समन्वयक म्हणून काम केले. त्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, कार्यालयीन कर्मचारी,सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य आणि प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष श्री. रविन्द्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे आणि सर्व संचालक यांनी या यशाबद्दल सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week