गो हत्येत कारस्थान संदीप ओम प्रकाश वैद्य !!

गो हत्येत कारस्थान संदीप ओम प्रकाश वैद्य !!

         महाराष्ट्र मध्ये गोवंश हत्या बंदी लागू असतानाही देखील बदलापूर येथील गोरेगाव गावामध्ये चोरीच्या गाई आणून तिथेच त्यांची कत्तल करून ते कल्याण आणि मुंबई येथे विकण्याचा मोठा व्यवसाय चालतो याची माहिती विश्व हिंदू सेवा संघ यांचे अध्यक्ष श्री संदीप वैद्य यांनी कमिशनर यांना देण्यासाठी फोन केला तेथील पी आर ओ नी सांगितले की तुम्ही तुमची तक्रार लेखी स्वरुपात द्या. त्यावर वैद्य यांनी लेखी स्वरुपात तक्रार दिल्यानंतर कमिशनर ऑफीस मधून बदलापूर कुळगाव पोलिस स्थानकामध्ये वर्ग करण्यात आली आणि तेथील एपीआय संदीप निगडे यांनी विश्व हिंदु सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य यांना फोन करून सांगितले की ती कोणती जागा आहे ते आम्हाला सांगा वैद्य यांनी सांगितले की आम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनची मदत नकोय, आम्हाला डीसीपी  यांच्या युनिट ची कारवाईसाठी मदत हवी आहे.

       त्याचा परिणाम असा झाला की एपीआय निगडे यांनी स्वतः रेड करून तेथील १२ गोमाता ऐवजी नऊच मिळाल्या असे सांगितले आणि तीन गाई जंगलामध्ये पळून गेल्या हे न पटल्यामुळे श्री विश्व हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य यांनी पुन्हा डीसीपी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु निगडे यांनी तोपर्यंत फ आर आय बनवून टाकला होता त्यामुळे वैद्य यांची खूपच अडचण झाली आणि जो मुद्देमाल मिळणार होता तो मिळाला नाही श्री वैद्य यांचे म्हणणे आहे की एपीआय निगडे अत्यंत क्राफ्ट आहेत आणि त्यांनी फार्म हाऊस वर स्वतः रेड करून आमच्या येण्याची वाट न बघता सर्व कामगिरी पारपाडली म्हणून आम्ही एफआरआयच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेणार आहोत आणि एपीआय निगडे यांच्या विरोधात गृहमंत्री यांना देखील तक्रार करून भेटणार आहोत असे विश्व हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष श्री संदीप ओम प्रकाश वैद्य यांनी सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week