सुरक्षितता हवी !

सुरक्षितता हवी !

          मुंबई महानगपालिकेच्या के इ एम रुग्णालयामध्ये सर्व देशभरातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. त्याचप्रमाणे बाह्य रूग्णांकरीता किरकोळ, लहान सहान आजाराच्या औषधोपचारासाठी हजारो रुग्ण, नातेवाईक येत आहेत. अशा सर्वांसाठी रुग्णालयाच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारची तपासणी न होता प्रवेश मिळतो. 

        तरी आता दिवाळी नंतर करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत इतर आजारांच्या रुग्णांमध्ये व सर्व सामान्य नागरिकांमध्ये करोना संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. (रुग्णालयामध्ये करोना पेशंट चे वेगळे वार्ड आहेत)

        रुग्णालयामध्ये कोणालाही प्रवेश देताना तापमान तपासणी, आणि सॅनिटायझरची सुरक्षतेकरीता सोय करण्याची आवश्यकता आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week