व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमुळे बचत !

व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमुळे बचत !

      करोना व्हायरस संबंधी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्री आणि नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या च्या द्वारे संवाद साधून विचारांची देवाणघेवाण घेऊन पुढील वाटचाली संबंधी माहिती घेत आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री आणि सचिवांशी संवाद साधला आहे. अशा पद्धतीमुळे, मुख्यमंत्री आणि नेत्यांना दिल्ली न जाता ही पंतप्रधानांना निर्णय देता येतात. त्यामुळे दिल्लीला जाण्याचा विमानप्रवास, वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे नुकतीच सुरक्षा परिषदे घेतली.

       सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे खटले ऐकायला लागले आहेत. अशा प्रकारे करोना व्हायरस सारखे संकटाचे स्वरुप बदलत असले तरी आपण त्या परिस्थितीवर मात करु शकतो. संकटाला आव्हान आणि आव्हानात ही संधी शोधताना वैज्ञानिक दृष्टिकोण आणि ज्ञानाची कास धरताना सर्वांशी संवाद साधताना व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे देशात आर्थिक मुकाबला करतांना वेळेची आणि इंधनाची बचत होऊ शकते.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week