शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकार अपयशी ~ सुप्रियाताई सुळे !

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकार अपयशी ~ सुप्रियाताई सुळे !

        दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाचा प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकार अपयशी असल्याची टीका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी येथे बोलताना व्यक्त केली. दक्षिण मुंबईतील ताडदेव तुळशीवाडी परिसरातील ताडदेव ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रियाताई सुळे उपस्थित राहिल्या होत्या त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

          राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. विजय वाडकर आणि मेघवाल समाजाचे नेते व समाजसेवक विजय कोळी यांच्या प्रयत्नाने ताडदेव तुळशीवाडी येथील तुळशीवाडी मैदानात महारक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. मागील आठवड्यात राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर विविध पक्षांच्या वतीने ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या धर्तीवर दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून विभागातील जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान आवाहन केले होते.

        या शिबिरास मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती शेकडो तरुणांनी उपस्थित राहून रक्तदान केले श्री. विजय कोळी यांनी ताडदेव तुळशीवाडी ते जनतेला रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एका रुग्णवाहिकेचे ही नियोजन केले होते या रुग्णालयाचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week