
सरकारला न्यायालयीन आधार हवा !!
शिवसेनेच्या फुटीर आमदारांमुळे महाविकास आघाडी अल्पमतात आली असता, शिंदे गटाच्या आमदार आणि भाजपचे आमदारांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे मागणी करून बहुमत सिद्ध केले आणि मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली.
मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घटना घडत आहेत. या घटनांना कोणताही न्यायालयीन आधार नसल्यामुळे सरकार आणि विरोधी पक्षातर्फे न्यायालयीन याचिका सादर केली आहे. त्यांचा योग्य निर्णय लागणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकशाहीतील चौथा स्तंभ आणि लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेली लोकशाहीचा विजय होईल.