मुंबईकर सावधान ! भांडुप संकुलात पाणी साचल्याने मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद !!

मुंबईकर सावधान ! भांडुप संकुलात पाणी साचल्याने मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद !!

         मुंबई दि.१८ मुंबईला पाणी शुद्ध करून पुरवठा  केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संकुलात पाणी साचले आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे रविवारी मुंबईतील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. पंपिंग हाउस मध्ये पाणी साचल्याने येथील पंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील साचलेल्या पाण्याचा निचरा केल्या शिवाय पंप दुरुस्थीचे काम करता येणार नसल्याने संपूर्ण मुंबईचा पाणी पुरवठा  रविवारी  बंद राहणार आहे.

      पंपिंग स्टेशनमध्ये शिरले पाणी

  मुंबईला दरदिवशी ३८०दश लक्ष अर्थात ३८० कोटी लिटर पाणी पुरवठा केला जातो, मुंबईला ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्या धरणातील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करून पुढे मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु रात्री पासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची भांडुप संकुल परिसरात अधिक नोंद झाली. त्यामुळे हे संकुल पाण्याखाली गेले असून पंपिंग स्टेशनात पाणी शिरले आहे. हे पाणी उपसण्याचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे.

     तर होणार उशिरा पाणी पुरवठा

महापालिका जल अभियंता व उप आयुक्त (अभियांत्रिकी विभाग) अजय राठोर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या भागात पाणी साचल्याने तसेच पंपिंग स्टेशनाचा विद्युत पुरवठयात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संम्पूर्ण मुंबईला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही असे सांगितले. सध्या जलद गतीने पाणी उपसण्याचे काम चालू आहे. ते झाल्यावर पंप सुरू करण्यात येतील. जर हे काम लवकर झाल्यास मुंबईला उशिरा पाणीपुरवठा केला जाईल असे माहिती देताना स्पष्ट केले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week