
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित, आयसीएसआय राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झाला गौरव !!
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित, आयसीएसआय राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झाला गौरव !!
मुंबई, भारत, २३ डिसेंबर २०२१: ‘स्पार्क मिंडा’ची प्रमुख कंपनी असलेल्या मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (मिंडा कॉर्प किंवा कंपनी एनएसई: MINDACORP, बीएसई: 538962) ला सहाव्या सीएसआर एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) च्या व्यवस्थापनातील नाविन्यपूर्णता आणि शाश्वतता आणण्याकरीता उदयोन्मुख श्रेणीमध्ये १८ डिसेंबर रोजी कंपनीला या पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारतीय कॉर्पोरेट जगतात (इंडिया इन्क) उत्कृष्ट प्रशासनाबाबत सर्वसमावेशक व्यापक अशी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दिला जाणारा हा पुरस्कार कॉर्पोरेट प्रशासन क्षेत्रातील व्यवसाय उद्योगांच्या आणि व्यावसायिकांच्या वाखाणण्याजोग्या अद्वितीय कामगिरीला प्रोत्साहन आणि दाद देण्याचे काम करतो. विविध कंपन्या व संस्थांच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी आयसीएसआयने कॉर्पोरेट प्रशासन क्षेत्रात विविध श्रेणीअंतर्गत अनेक पुरस्कार विजेते जाहीर केले.
मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड ही जनमानस आणि आपली धरती यांच्या समन्वित आणि सर्वसमावेशक प्रगती व विकासाच्या बाबतीत संपूर्णपणे बांधिलकी राखून आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) च्या व्यवस्थापनातील नाविन्यपूर्णता आणि चिरस्थायित्व आणण्याच्या दिशेने कंपनी करत असलेली कार्याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे.
या कामगिरीबद्दल मत व्यक्त करताना समूह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष श्री. अशोक मिंडा म्हणाले:
“सीएसआर क्षेत्रात आम्ही करत असलेल्या धडपडीला एवढ्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या रूपाने दाद मिळाली याबद्दल आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपल्या काटेकोर आणि समर्पित बांधिलकीच्या द्वारे आपले लोक आणि आपली धरती यांच्या समन्वित आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी मिंडा या क्षेत्रात किती झळाळून उदयाला येत आहे, हे या पुरस्काराने दाखवून दिले आहे. स्वतःला आणखी प्रेरित राखण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्नशील राहणार असून आम्ही साध्य केलेल्या या ठळक मैलांच्या टप्प्याच्याही आणखी पुढे जाऊन क्षितिजावर उदयाला येण्याचा आमचा मानस आहे.
संस्थेच्या आणि पुरस्कार विजेत्यांच्या प्रयत्नांना खुली दाद देताना केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री श्री. अमित शहा म्हणाले, की “कोणत्याही राष्ट्राची प्रगती त्याच्या सक्षम आणि कणखर प्रशासन रचना आराखड्यावर अवलंबून असते आणि भारताच्या प्रगतीपथावरील मार्गक्रमणेत येथील कंपनी सचिवांनी अत्यंत परिणामकारक भूमिका बजावलेली आहे.” ते पुढे असेही म्हणाले, की “सरकार आपला भरवसा पुनर्स्थापित करत असून आता कंपनी सचिवांच्या खांद्यावर ही जबाबदारी देत आहे, की त्यांनी भारतीय कॉर्पोरेट जगतात उत्कृष्ट प्रशासनाच्या सक्षम संस्कृतीची रुजवात करावी. त्यामुळे, त्यांची भूमिका आता केवळ एक नोकरी किंवा व्यवसाय एवढ्यापुरती मर्यादित न राहता त्याच्या कित्येक योजने पुढे जाऊन पोचलेली आहे. त्यांनी आता देशाच्या प्रशासन चौकटीचा आराखडा निश्चित करणारे महत्वपूर्ण सुकाणूधारक – चालक म्हणून कामगिरी निभवायची आहे.