
मुंबईतील नादुरुस्त फायर हायड्रेन्ट पॉईंट चालू करा !
मुंबईमध्ये आग लागल्यानंतर ब्रिटिश काळापासून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पाणी भरण्यासाठी फायर हायड्रंट पॉईंट नाक्यानाक्यावर व गल्लोगल्ली बसवण्यात आले होते. सध्याच्या स्थितीत ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. काहीवेळा आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीतील पाणी संपल्यामुळे पाणी भरण्यासाठी दूरवर जावे लागते. जर का फायर हायड्रंट पॉईंट दुरुस्त करून सुरू केले. तर त्याचा वापर तात्काळ आग विझवण्यासाठी होऊ शकतो.
याबाबत युवासेनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वरळी विधानसभेचे युवासेना उपविभाग अधिकारी श्री.अभिजित पाटील यांनी प्रमुख अभियंता जलकामे श्री.अ.सु.राठोर यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन दिले. त्यांनी मी मुंबई मधील फायर हायड्रंट पॉईंटची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून ते दुरुस्त करुन पूर्वरत करून देऊ असे आश्वासन दिले व त्याबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार मानले.