तिन्हीही ठाकरेंना वरळी कोळीवाड्यातील नागरिकांच खुलं पत्र !

तिन्हीही ठाकरेंना वरळी कोळीवाड्यातील नागरिकांच खुलं पत्र !

प्रति,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

आमदार अदित्य ठाकरे 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

     विषय - वरळी कोळीवाड्याला कुणी वाली आहे का ? आम्हाला वाऱ्यावर सोडू नका !

   मुंबईतील वरळी कोळीवाड्याची आणि कोळी बांधवाची बदनामी करणाऱ्या बातम्या काही मराठी न्यूज चँनेल चालवत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या अर्धसत्य दाखवणा-या आहेत. इथल्या परिस्थितीची माहिती न घेता आणि वरळीकरांशी न बोलता या चुकीच्या बातम्या दाखवणा-या माध्यमांचा आम्ही निषेध करतो. कृपया बातमी दाखवताना त्याची शहानिशा करा. 

    वरळी कोळीवाड्यातील खरी परिस्थितीत काय ? 

  वरळी कोळीवाड्यात सध्या कर्फ्युमुळे अत्यावश्यक सेवा बंद आहेत त्यात किराणा माल, दवाखाने, मेडीकल स्टोअर्स आणि दूध या सेवाचा समावेश आहे. 

    लहान मुलांना दूध नाही, पेशटंना उपचारासाठी दाखवायला दवाखाने नाहीत, पेशटला गोळ्या नाहीत लोकांच्या घरात खायला अन्न नाही, पैसे आहेत पण किराणा मालाची दुकान बंद असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत नाही.

  कोळीवाड्यातील कोळी लोकांचा व्यवसाय पूर्णपणे मासेमारी अंबलबून असतो त्याला देखील फटका बसला आहे. 

   परिस्थितीत सुरळीत करण्याचा थोडका प्रयत्न होतो परंतु तो पुरेसा नाही, 

     प्रशासनाकडून कुठल्याही क्लिअर सुचना वरळीकरांना दिल्या जात नाहीत, हा कर्फ्यु किती दिवासाचा आहे. तो किती दिवस चालणार आहे त्यामुळे वरळीकर प्रचंड नाराज आणि संतप्त आहेत.

     वरळी कोळीवाड्यात नागरिकं प्रशासनाला सहाकार्य करत आहेत परंतु आम्हाला विश्वासात घेतल जात नाही आहे. आम्हाला विश्वासात घेऊन प्रशासनाने पुढील गोष्टी कराव्यात हि आमची विनंती आहे. 

   आम्हा वरळीकरांना वाऱ्यावर सोडू नका , आमचं पोट आमच्या धंद्यावर आहे. आम्ही धंदा लावत नसल्यामुळे आमच्याकडे दररोज  खर्चासाठीही पैसैही नाहीत. या प्रश्नी सर्व ठाकरे परिवारांनी लक्ष घालून हा वरळीकरांचा प्रश्न सोडवावा हि विनंती.

     ह्या कोळीवाड्यातील मुंबईच्या मुळ माणसासोबत अन्याय होत आहे त्याच्यावर तोडगा काढवा सर.

        धन्यवाद 

समस्त वरळी कोळीवाडा नागरिक

   असे पत्र दिल्याची माहिती समोर आल्याचे समजते आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week