
वरळी कोळीवाड्यातील जनता कोरोना बाबत बेफिकीर स्थानिक रहिवाशी सौ. लाड यांचा गम्भीर आरोप !
वरळी कोळीवाड्यातील जनता कोरोना बाबत बेफिकीर स्थानिक रहिवाशी सौ. लाड यांचा गम्भीर आरोप !
नमस्कार....मी सौ. राजवी रुणाल लाड राहणार वरळी कोळीवाडा. एक सामान्य नागरिक म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की, माझ्या विभागात राहणाऱ्या लोकांना अजून पर्यंत CORONA सारख्या अतिशय गंभीर जीवघेण्या रोगाबद्दल काहीच गांभीर्य वाटत नाही आहे. तर कृपया सरकारने योग्य ती कारवाई करावी.
सरकारने सगळी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवली आहेत कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी जाऊन सामान घेता यावे आणि गर्दी होऊ नये. पण आमच्या कोळीवाड्यातील लोकं रोजच्या रोज फ्रेश वस्तू वापरता आल्या पाहिजे म्हणून रोजच घराबाहेर पडत आहेत आणि बिनधास्त बाहेर फिरत आहेत. लोकांना अजून पण ह्या गोष्टीच गांभीर्य नाही कळत की आपल्या कोळीवाडयात चाळीत राहणारे लोक आहेत. जर हा विषाणू पसरत गेला तर पूर्ण कोळीवड्यातल्या लोकांना ह्याची लागण होईल. आणि त्याप्रमाणे ह्याची सुरुवात झालेली आहे. आज वरळी कोळीवाडा येथे ४ पॉझिटीव्ह पेशन्ट मिळाले आहेत, नागरिकांनो आता तरी जागरूक व्हा आणि घराबाहेर पडणे टाळा.
खरंच पोलीसांनी देखील योग्य ती कारवाई करणे चालू केले पाहिजे त्याशिवाय येथील लोकांना लॉकडाऊन म्हणजे काय ह्याचे गांभीर्य कळणार नाही.